Type Here to Get Search Results !

बाहेरचे लोक थेट वाल्मीक कराडच्या कोठडीपर्यंत जातात:माझ्यावर पोलिस ठाण्यात आरेरावी केली, धनंजय देशमुख यांचे पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

बीड सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी पोलिस आधीक्षकांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी तक्रार मांडल्या आहेत. पोलिस ठाण्यात त्यांना पोलिसांकडून आरेरावी केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच बाहेरील लोक थेट वाल्मीक कराड असलेल्या कोठडीपर्यंत जात असून कराडला सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांनी पत्रात म्हंटले की, मी नामे धनंजय पंडितराव देशमुख असून माझे बंधू संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून करण्यात आली. या हत्ये संदर्भात आज 24 दिवस उलटले असून या कामी पोलिस स्टेशन शहर बीड येथे गेलो असता, खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मीक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलिस ठाण्यात गेले. मला विचारले तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मीक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हंटले तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला व आरेरावी केले आणि संताप जनक माझ्याशी वागला. पुढे धनंजय देशमुख म्हणतात, आम्ही सदरील घटना पोलिस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सीआयडी सोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचे म्हटला. रेडेकर यांच्याशी हुजत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिले. मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे ज्या ठिकाणी आरोपी आहेत अश्या ठिकाणी असे लोक येतात कसे, खुन करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. एपीआय दराडे यांची चौकशी करा अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मीक कराड यांच्या पासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते, असे धनंजय देशमुख यांनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/js5Fo34

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.