मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख खून प्रकरणानंतरमंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडयाच्यावर अवादा एनर्जी या पवनचक्की कंपनीकडे २काेटींची खंडणी मागितल्याचा गुन्हाकेज पाेलिसांत दाखल आहे. याप्रकरणानंतर २२ दिवस कराड हापसार झाला हाेता आणि तीन ते चारसाथीदारांसह ताे विविध राज्यातफिरला असल्याचे सीआयडीच्यातपासात समाेर आले आहे. ११ डिसेंबरराेजी मध्यप्रदेशातील उज्जैन येथेसाथीदारांसाेबत महाकालचे दर्शन घेतल्यानंतर कराड हापरळीमध्ये येऊन पुन्हा १५ दिवस पसार झाला होता,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परळीत कराड हा कशासाठी गेला, किती काळथांबला, काेणाला भेटला, त्याची खबर पाेलिसांनाकशी मिळाली नाही. कराड याच्याविराेधात केजपाेलिस ठाण्यात सुनील शिंदे यांनी खंडणीचीतक्रार दिली हाेती. त्यानंतर वाल्मिक हा पसारझाला हाेता. त्याने १३ डिसेंबर पर्यंत स्वत:चामाेबाईल सुरू ठेवला हाेता. परंतु त्यानंतर माेबाईलवापर बंद करून ताे त्याचा ठावठिकाणा बदलतहाेता. त्याचा शाेध एकूण दहा पथके घेत हाेती वकराडशी संबंधित १०० पेक्षा अधिक जणांचे जबाबदेखील नाेंदवून घेत विचारपूस करण्यात आली.उज्जैन येथून कराड हा पुन्हा परळीत येऊन पुढेगाेवा, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी ठिकाणीफिरला असून त्याने यादरम्यान माेबाईलचा वापरकरणे तसेच बँकेचे आॅनलाइन व्यवहार टाळले. आरोपींना १० दिवसांत अटक करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आश्वासन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीसह इतर दोघांना तत्काळ अटक करावी,देशमुखांच्या पत्नीस शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, या मागण्यांसाठी बुधवारी सकाळी १० वाजतामहिला व ग्रामस्थांनी गावाजवळील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले. पोलिस अधीक्षक नवनीतकाँवत यांनी मस्साजोग गाठून आरोपींना १० दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडीचतासांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दीडशेहून अधिक पुरुष आणि ७० महिलांनी सहभाग नोंदवला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cAxBwzh
फरार असतानाही वाल्मीक कराड उज्जैनवरून परळीत आला:गोवा, विजयवाड्यात फिरला, साथीदारही सोबत, 13 डिसेंबरनंतर मोबाइल बंद, ऑनलाइन व्यवहार टाळले
January 01, 2025
0