Type Here to Get Search Results !

फरार असतानाही वाल्मीक कराड उज्जैनवरून‎ परळीत आला:गोवा, विजयवाड्यात फिरला‎, साथीदारही सोबत, 13 डिसेंबरनंतर मोबाइल बंद, ऑनलाइन व्यवहार टाळले‎

मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख खून प्रकरणानंतर‎मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड‎याच्यावर अवादा एनर्जी या पवनचक्की कंपनीकडे २‎‎काेटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा‎‎केज पाेलिसांत दाखल आहे. या‎‎प्रकरणानंतर २२ दिवस कराड हा‎‎पसार झाला हाेता आणि तीन ते चार‎‎साथीदारांसह ताे विविध राज्यात‎‎फिरला असल्याचे सीआयडीच्या‎‎तपासात समाेर आले आहे. ११ डिसेंबर‎‎राेजी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे‎साथीदारांसाेबत महाकालचे दर्शन घेतल्यानंतर कराड हा‎परळीमध्ये येऊन पुन्हा १५ दिवस पसार झाला होता,‎अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‎ परळीत कराड हा कशासाठी गेला, किती काळ‎थांबला, काेणाला भेटला, त्याची खबर पाेलिसांना‎कशी मिळाली नाही. कराड याच्याविराेधात केज‎पाेलिस ठाण्यात सुनील शिंदे यांनी खंडणीची‎तक्रार दिली हाेती. त्यानंतर वाल्मिक हा पसार‎झाला हाेता. त्याने १३ डिसेंबर पर्यंत स्वत:चा‎माेबाईल सुरू ठेवला हाेता. परंतु त्यानंतर माेबाईल‎वापर बंद करून ताे त्याचा ठावठिकाणा बदलत‎हाेता. त्याचा शाेध एकूण दहा पथके घेत हाेती व‎कराडशी संबंधित १०० पेक्षा अधिक जणांचे जबाब‎देखील नाेंदवून घेत विचारपूस करण्यात आली.‎उज्जैन येथून कराड हा पुन्हा परळीत येऊन पुढे‎गाेवा, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी ठिकाणी‎फिरला असून त्याने यादरम्यान माेबाईलचा वापर‎करणे तसेच बँकेचे आॅनलाइन व्यवहार टाळले.‎ आरोपींना १० दिवसांत अटक करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आश्वासन‎ सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीसह इतर दोघांना तत्काळ अटक करावी,‎देशमुखांच्या पत्नीस शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, या मागण्यांसाठी बुधवारी सकाळी १० वाजता‎महिला व ग्रामस्थांनी गावाजवळील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले. पोलिस अधीक्षक नवनीत‎काँवत यांनी मस्साजोग गाठून आरोपींना १० दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडीच‎तासांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दीडशेहून अधिक पुरुष आणि ७० महिलांनी सहभाग नोंदवला.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/cAxBwzh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.