येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातूनवाटप करण्यात आलेल्या जन्म- मृत्यूप्रमाणपत्रांच्या फायलींसोबत जोडलेल्याकागदपत्रांच्या छायांकित प्रती माजी खासदारकिरीट सोमय्या यांनी माहिती अधिकारातमागितली आहे. ही माहिती देण्यासाठीउपविभागीय अधिकारी कार्यालयात चारदिवसांपासून शोधाशोध सुरू आहे. शिवायउशिराने मागणी केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रदेण्याचे अधिकार न्यायालयाकडून उपविभागीयअधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर याकार्यालयाकडून वाटप झालेल्या २८८६प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार आहे. शिवाय१९१७ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. मागील आठवड्यात माजी खासदार किरीटसोमय्या हे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनाभेटले होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यात दहाहजारांपेक्षा जास्त बांगलादेशी व रोहिंगे नागरिक वास्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप केला. यादरम्यान त्यांनी सिल्लोड तालुक्यात ४७३० बांगलादेशी व रोहिंगे नागरिक असल्याबाबतचा दावाही केला होता. या अनुषंगाने ते सोमवारी(२० जानेवारी) सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याशी दोन तास चर्चा केल्यावर त्यांनी यादरम्यान कागदपत्रांची तपासणी केली. सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडूनजन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची माहिती मागवली आहे. कन्नड- खुलताबादेत ५८३ अर्ज प्रलंबित कन्नड व खुलताबादतालुक्यात ५८३ जन्म- मृत्यूप्रमाणपत्रांचे अर्ज प्रलंबितठेवण्यात आले आहेत. नवीनआदेशामुळे कन्नडउपविभागीय अधिकारी तथाउपविभागीय दंडाधिकारीयांच्या कार्यालयात कन्नडतालुक्यातील ३३० वखुलताबाद तालुक्यातील २५३असे एकूण ५८३ जन्म मृत्यूप्रमाणपत्रांची सुनावणी वआदेश प्रलंबित आहेत, अशीमाहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही पूर्वीपासूनच आम्ही शहरात अथवा शहरालगतच्या हॉटेल,लॉज, बिअर बार आदी ठिकाणी दिवसा-रात्री सरप्राइजव्हिजिट करत असतो. यात अद्यापपर्यंत काही संशयास्पदआढळून आलेले नाही. -शेषराव उदार, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शासनाचे २१ रोजीचे पत्रसोशल मीडियावर व्हायरल महाराष्ट्र शासनाचे उपसचिव महेश वरुडकरयांच्या स्वाक्षरीने २१ जानेवारी २०२५ रोजीचेएक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेआहे. यात म्हटले की, जन्म-मृत्यू नोंदणीकायदा १९६९ मध्ये सुधारणा करून उशिराजन्म व मृत्यू नोंदणीसंबंधीचे अधिकारजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारीयांना प्रदान करण्यात आले आहेत. यानुसार,उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतकरण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भातशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्तझाल्या आहेत. चौकशीसाठी करण्याकरितागृह विभागाने पथकाची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकारीकार्यालयाकडून वाटप करण्यातआलेल्या आतापर्यंतच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांवर किरीट सोमय्यायांनी आक्षेप घेतल्यानंतरउपविभागीय अधिकारी लतीफपठाण यांनी वाटप केलेल्या या सर्वप्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचेआदेश जारी केले असून, तपासणीसुरु झाली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/N0malRx
सिल्लोडमध्ये 2886 जन्म-मृत्यूप्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी:किरीट सोमय्यांनी आरटीआयअंतर्गत मागवली प्रमाणपत्रांची माहिती
January 23, 2025
0