एकीकडे इराण जुना मित्र. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी. दुसरीकडे इस्रायलकडून कायम भारताला खंबीर पाठिंबा, तांत्रिक साहाय्य. यामुळे भारताने इराण-इस्रायल युद्धात कोणतीही भूमिका घेतली नाही, असे म्हटले जाते. मात्र, यामुळे शरद पवार प्रचंड नाराज झाले आहेत. बघ्याची भूमिका घेतल्याने भारताला आता दूरगामी परिणाम भोगावे लागणार, असा अतिशय गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई येथे काही पत्रकारांना अनौपचारिक चर्चेसाठी बोलावून त्यांनी मनातल्या गोष्टी औपचारिकपणे व्यक्त केल्या. ते म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धात भारताने बघ्याची भूमिका घेणे अचंबित करणारे आहे. अरब देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय काम करतात. शिवाय तेलाचाही संबंध आहे. त्यामुळे या दोन देशांच्या युद्धामध्ये भूमिका न घेणे योग्य नाही, माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने ते म्हणाले की, सरकारमध्ये मोठ्या पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुक लढवू नये. मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही. तिसऱ्या भाषेचे ओझे नको, पण हिंदी शिकली पाहिजे सध्या पाचवीपासून मुले हिंदी शिकतात. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही. मात्र हिंदी भाषा शिकणेही तितकेच महत्वाचे आहे. देशातील सुमारे ५५ टक्के नागरिक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे हिंदीचा विरोध करण्याची गरजही नाही, असे दोन्ही बाजूंची सारवासारव करणारे वक्तव्य शरद पवारांनी केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3IjVhyB
भारताला दूरगामी परिणाम भोगावे लागण्याचा दिला इशारा:इराण-इस्रायल युद्धात भारताच्या भूमिकेवर शरद पवार प्रचंड नाराज
June 24, 2025
0