Type Here to Get Search Results !

वैजापुरात अवकाळीमुळे 19 हजार ‎हेक्टरवरील कांद्याचे पीक धोक्यात‎:शेतकऱ्यांसमोर नवे संकट; ढगाळ वातावरणामुळे उत्पादन घसरण्याची शक्यता‎

गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ‎वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले‎आहेत. यादरम्यान कांद्यावर करप्या रोगाचा‎प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी‎कांदा पूर्णपणे पांढरा पडला आहे. रोग आटोक्यात‎आणण्यासाठी महागड्या औषधाची फवारणी‎करुन शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. वैजापूर ‎तालुक्यात १९ हजार हेक्टर कांदा पिकाची लागवड‎करण्यात आली. ढगाळ हवामानामुळे कांदा व‎अन्य पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत अाहे.‎यातून यंदा पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवले‎आहे. या हवामानामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात‎घट होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात‎सापडले आहेत. या वर्षी भरपूर पाणी असल्याने‎शेतकरी कांदा पिकाकडे वळला आहे. कांदा‎मोठ्या प्रमाणात घेतला जात असताना या‎पिकावर ढगाळ हवामानाचा परिणाम होत आहे.‎ फवारणी खर्च एकरी दोन ते तीन हजार रुपये‎ वाढत्या धुक्‍यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे.‎कांद्यावरील मर रोग, करपा व माव्यामुळे रासायनिक औषधे‎फवारणी करण्यासाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये एका‎फवारणीला खर्च येतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या‎दुकानांमध्ये गर्दी होत आहे. कांदा पीक काढणीला येईपर्यंत‎शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडते का, अशी भीती आहे.‎ बुरशीनाशक फवारणीचे‎ असे नियोजन करावे‎ परतीच्या पावसामुळे कांदा पिकामध्ये‎जांभळा करपा किंवा पीळ रोग‎येण्याची शक्यता आहे. त्यामुळे‎शेतकरी बांधवांनी व्यवस्थापनासाठी‎पुढील प्रमाणे बुरशीनाशकाच्या‎आलटून पालटून फवारणी घ्याव्या.‎झेड -७८ १.५ ग्रॅम/लिटर किंवा‎फोलिक्यूअर १ मिली/लिटर किंवा‎बेनलेट १ ग्रॅम /लिटर व सोबत‎त्यामध्ये विद्राव्य खत १३:००:४५ ७५‎ग्रॅम/पंप प्रमाण घेऊन फवारणी‎करावी, असा सल्ला मालेगाव‎केव्हीकेचे पीक संरक्षण तज्ज्ञ कृषी‎पर्यवेक्षक डी. व्ही. पुंड यांनी‎शेतकऱ्यांना दिला आहे.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RAntezg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.