गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळवातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झालेआहेत. यादरम्यान कांद्यावर करप्या रोगाचाप्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणीकांदा पूर्णपणे पांढरा पडला आहे. रोग आटोक्यातआणण्यासाठी महागड्या औषधाची फवारणीकरुन शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. वैजापूर तालुक्यात १९ हजार हेक्टर कांदा पिकाची लागवडकरण्यात आली. ढगाळ हवामानामुळे कांदा वअन्य पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत अाहे.यातून यंदा पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवलेआहे. या हवामानामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणातघट होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटातसापडले आहेत. या वर्षी भरपूर पाणी असल्यानेशेतकरी कांदा पिकाकडे वळला आहे. कांदामोठ्या प्रमाणात घेतला जात असताना यापिकावर ढगाळ हवामानाचा परिणाम होत आहे. फवारणी खर्च एकरी दोन ते तीन हजार रुपये वाढत्या धुक्यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे.कांद्यावरील मर रोग, करपा व माव्यामुळे रासायनिक औषधेफवारणी करण्यासाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये एकाफवारणीला खर्च येतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्यादुकानांमध्ये गर्दी होत आहे. कांदा पीक काढणीला येईपर्यंतशेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडते का, अशी भीती आहे. बुरशीनाशक फवारणीचे असे नियोजन करावे परतीच्या पावसामुळे कांदा पिकामध्येजांभळा करपा किंवा पीळ रोगयेण्याची शक्यता आहे. त्यामुळेशेतकरी बांधवांनी व्यवस्थापनासाठीपुढील प्रमाणे बुरशीनाशकाच्याआलटून पालटून फवारणी घ्याव्या.झेड -७८ १.५ ग्रॅम/लिटर किंवाफोलिक्यूअर १ मिली/लिटर किंवाबेनलेट १ ग्रॅम /लिटर व सोबतत्यामध्ये विद्राव्य खत १३:००:४५ ७५ग्रॅम/पंप प्रमाण घेऊन फवारणीकरावी, असा सल्ला मालेगावकेव्हीकेचे पीक संरक्षण तज्ज्ञ कृषीपर्यवेक्षक डी. व्ही. पुंड यांनीशेतकऱ्यांना दिला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RAntezg
वैजापुरात अवकाळीमुळे 19 हजार हेक्टरवरील कांद्याचे पीक धोक्यात:शेतकऱ्यांसमोर नवे संकट; ढगाळ वातावरणामुळे उत्पादन घसरण्याची शक्यता
December 30, 2024
0