Type Here to Get Search Results !

शंभर शेतकऱ्यांनी मागितल्यास ‘मागेल त्याला बंधारा’- राठोड:‘जलयुक्त’च्या दुसऱ्या टप्पात 5 हजार गावे

पाणीपातळीमध्ये वाढ करण्यासाठी आणि शेती सिंचनाखाली आणण्यासाठी ‘जलयुक्त शिवार टप्पा-दोन’अंतर्गत ५ हजार गावांची निवड करण्यात आली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, १०० शेतकऱ्यांनी मागणी केल्यास ‘मागेल त्याला बंधारा’ योजनेची सुरुवात, तर जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून राज्यभरात जानेवारीमध्ये ‘पाणलोट यात्रा’ काढण्यात येणार आहे. याची सुरुवात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातून होणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. मंत्री झाल्यानंतर राठोड प्रथमच गुरुवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट दिली. या वेळी बोलताना मंत्री राठोड म्हणाले की, राज्यामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. मात्र, मधल्या काळात या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये नवीन ५ हजार गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना टँकरमुक्त करण्यात येणार आहे. ५९० उमेदवारांना जानेवारीत देणार नियुक्तिपत्र जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५९० जागा भरण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली असून जानेवारीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5mVcjFX

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.