Type Here to Get Search Results !

शरद पवार भाकरी फिरवणार?:विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पवार नाराज असल्याच्या चर्चा, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?

शरद पवार भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पवार पक्ष- संघटनेच्या कामावर नाराज असल्याच्या चर्चा आहे. यात आता विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद जाणार की राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अपेक्षेपेक्षा फारच वाईट होता. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या पक्षात अनेक मोठे बदल घडवून आणणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक पदांवर मोठे फेरबदल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे युवा अध्यक्ष, महिला अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्षांसहित वेगवेगळे प्रमुख बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही चौकशी सुरु असली तरी पक्षातील एकच गट जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यावर ठाम आहे. शरद पवार पक्षश्रेष्ठींचा सल्ला घेतील 8 जानेवारीला सर्व आमदार, खासदार आणि विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनाही 9 जानेवारीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहे. विधानसभेत पवारांना 10 उमेदवार विजयी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसने महाविकास आगाडी अंतर्गत विधानसभेला 87 जागा लढवल्या. मात्र, त्यांना केवळ 10 जागाच जिंकता आल्या. महाराष्ट्रात महायुतीच्या लाटेत विरोधी महाविकास आघाडीला पराभव पत्कारावा लागला. एकिकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर असे मानले जात होते की, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची वापसी झाली. लोकसभेत 10 पैकी 8 जागा जिंकल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले, हा पक्षाचा मोठा पराभव असल्याचे मानले जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZSaEgcN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.