पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अनिकेत रतन आल्हाट (११) व दिनेश विशाल देठे (१०) अशी मृतांची नावे आहेत. पोखर्डी गावाजवळच चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्या ठिकाणी विहीर आहे. शाळेला सुट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवत होती. त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iscpby0
पतंग पकडण्यासाठी पळताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू:अहिल्यानगरच्या पोखर्डी शिवारातील घटना
December 27, 2024
0