एमबीबीएसच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना जीसीएमसी ८० ने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील १४८ शेतकऱ्यांना शेतीसाठी ५० लाखांपेक्षा जास्त निधी संकलित करून पाण्याच्या टाक्यांसह ठिबक सिंचनाची सुविधा दिल्याने ३ वर्षांत २०० एकराहून अधिक शेतजमीन ओलिताखाली आली आहे. आधी पावसाच्या पाण्यावर सहा महिने शेतीतून केवळ २० हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने उरलेली सहा महिने त्यांना मजुुरी करून दिवस काढावे लागत होते. आता बारमाही शेती फुलल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांवर गेले आहे. नाशिकपासून ७० ते १०० किमी अंतरावरील ६० आदिवासी पाड्यांवर गेल्या ९ वर्षांपासून श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती ही आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, जल उपक्रम, सेंद्रिय शेती व महिला सबलीकरण या सहा आयामांवर सेवाकार्य करत आहे. या अंतर्गतच मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीसीएमसी) १९८० च्या विद्यार्थ्यांच्या संघटनेेने पाड्यांवरील बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी शेती व्यवसायाला प्राेत्साहन दिले. चार विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार जीसीएमसी ८० च्या संघटनेचे अमेरिकेत राहणारे डॉ. आशुतोष लोहे, डॉ. विजय मालपाठक, डॉ. सदानंद नायक आणि डॉ. माधुरी किर्लोस्कर या चाैघा माजी विद्यार्थ्यांनी देश-विदेशातील आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने निधी जमवला. सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून ठिबक सिंचन व सेंद्रिय शेतीचा उपक्रम समाेर ठेवून हे कार्य हाती घेतले. पेरू, आंबा, चिकू बागा केल्या विकसित शेतकऱ्यांनी खडकाळ व डोंगर उतारावरील जमिनीचा फायदा मिळवत येथे पेरू, अांबा, चिकू व लिंबाच्या बागा विकसित केल्या आहेत. नवरात्र व दिवाळीच्या काळात येथे झेंडूच्या बागाही फुलतात. त्यातूनही चांगले उत्पन्न हे शेतकरी मिळवतात. आता गोपालन करून त्याच्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करण्याचे कामही शेतकरी करत आहेत. शेती विकसित झाल्याने पाड्यावरील शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबण्यास मदत शेती विकसित झाल्याने आता पाड्यांवरील शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबले असून त्यांचे जीवनमानही उंचावले आहे. पुढे अधिक निधी जमवून परिसरातील आणखी शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे नियोजन आहे. - डॉ. सदानंद नायक, जीसीएमसी ८०
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fzJkb47
डाॅक्टरांनी 148 शेतकऱ्यांची 200 एकर शेती आणली सिंचनाखाली:50 लाख रुपये जमवून केली ठिबकची साेय, नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांचे 20 हजार उत्पन्न 3 लाख रुपयांवर
February 16, 2025
0