राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे राज्यभरातील रुग्णालयांचे गेल्या नऊ महिन्यांपासून सुमारे ९२३ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती सरकारने थकवली आहे. शासनाकडून पैसेच मिळत नसल्याने रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, रुग्णालयांना प्रतिपूर्ती न मिळाल्यास या योजनेची सेवा थांबविण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा आयएमएने दिला आहे. या योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालयांद्वारे मोफत उपचार केले जातात. उपचारानंतर रुग्णालय व्यवस्थापन सरकारकडे बिलाच्या रकमेचा दावा करून त्याचा परतावा घेते. मात्र, ही रक्कम पदरात पाडून घेताना खासगी रुग्णालयांना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. जूनमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ३०५९ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ८१५.७४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याने रुग्णालयांची अडचण झाली आहे. पैसे नाही, सहा रुग्णांना परत पाठवले नाशिकमधील एका नामवंत खासगी रुग्णालयात हृदयरोग व कर्करोगाचे ६ रुग्ण उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, जीवनदायी आरोग्य योजनेतून शासनाकडून रुग्णालयांना वेळेत पैसे मिळत नसल्याने त्यांनी रुग्ण परत पाठवले. आता त्यांच्यावर संदर्भ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - संजय परदेशी, सामाजिक कार्यकर्ते अन्यथा सेवाच करणार बंद या योजनेचे काम विमा कंपनीकडून काढून शासनाने स्वतःकडे घेतल्यापासून बिलांच्या परताव्यासाठी खासगी रुग्णालयांना कसरत करावी लागत आहे. रुग्णालयांनी स्वतःचे पैसे टाकून लाभार्थींवर उपचार केले. अनेक रुग्णालय कर्जबाजारी झाले. सरकारने तातडीने बिलाचे पैसे द्यावे अन्यथा सेवा थांबविण्याशिवाय पर्याय नाही. - डॉ. संजय पाटील, राज्य सचिव, आयएमए सरकारकडे ९ महिन्यांपासून पैसे अडकले परतावा का मिळत नाही? परतावा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच दिला जाईल. योजना ॲश्युरन्स मोडवर गेल्यापासून परतावा थांबला? योजना व्यवस्थित सुरू आहे. आर्थिक नियोजनानंतर रुग्णालयांना पैसे वितरीत केले जातील. लाडकी बहीण योजनेमुळे अडचण निर्माण झाली का? तसे काही नाही. योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, शासनाकडून रुगणालयांना वेळेत प्रतिपूर्तीच दिली जात नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे रुग्ण, रुग्णालय आणि शासनात वाद निर्माण होऊन त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. स्वत: पैसे भरून आजीची केली शस्त्रक्रिया सांधेरोपणासाठी आजीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, जनआरोग्य योजनेचे पैसे शासनाकडून वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर आम्ही स्वत: पैसे भरून उपचार करून घेतले. ऐनवेळेस धावपळ झाली. रुग्णालयांना शासनाने वेळेत पैसे देण्याची गरज आहे. - अंकुश राऊत, रुग्णाचे नातेवाइक
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/K97yANs
‘लाडकी बहीण’ने ‘जनआरोग्य’बिघडले:923 कोटी रखडले, राज्यभरातील रुग्णालयांचे सरकारकडे 9 महिन्यांपासून पैसे अडकले
March 14, 2025
0