काही वर्षांपूर्वी आलेली “बालिकावधू’ही मालिका प्रचंड गाजली होती. पण “रिल’ पेक्षा “रिअल’चे चित्र धक्कादायक आहे. महाराष्ट्रात हजारो मुली कोवळ्या वयात संसाराचा भार वाहत आहेत. प्रत्येक दिवशी १२० ते १२५ अल्पवयीन मुली माता झाल्याची माहिती विधिमंडळात खुद्द महिला आणि बालविकासमंत्र्यांनी दिली होती. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यात महिला व बालविकास विभागाने ४,०३९ बालविवाह रोखल्याचा दावा माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत केला. पण या कालावधीत केवळ ३४२ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला माेठ्या प्रमाणात बालविवाह हाेतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभाग सतर्क झाला आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात गेल्या १२ ते १३ वर्षात २ कोटी बालविवाह झाले. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात मराठवाडा अग्रेसर आहे. यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात परभणी पहिल्या क्रमांकावर येतो. जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत एकूण १८७ बालविवाह रोखण्यात आले. यापैकी १० प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांत एकूण २४० बालविवाह रोखण्यात आले. यापैकी ३० प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत एकूण ५१९ बालविवाह रोखण्यात आले. यापैकी ४५ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत एकूण ८३१ बालविवाह रोखण्यात आले. यापैकी ७४ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले. यात परभणी ६४, छत्रपती संभाजीनगर ४७, बीड ६४, हिंगोली २९, जालना २२, लातूर २४, नांदेड २७, धाराशिव २९ व परभणीत ६४ बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारणांमुळे होतात मोठ्या प्रमाणात बालविवाह संबंधित पालकांना शिक्षा होणे गरजेचे महाराष्ट्रात प्रत्येक वाईट गाेष्टी रोखण्यासाठी कायदा आहे. या कायद्यांची प्रामाणिकपणे कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तेवढे केले तरी अनेक अनिष्ट गोष्टींना पायबंद बसेल. यासाठी सरकारी यंत्रणेची इच्छाशक्तीही हवी. अशा प्रकरणांत आई-वडिलांनाही शिक्षा होणे गरजेचे आहे. तरच कायद्याचा धाक राहील. तेवढ्यापुरते बालविवाह रोखल्याने काही होणार नाही. कायद्यासोबत प्रबोधन होणेही गरजेचे आहे. मुली सर्वच क्षेत्राच चमकत असताना आजही विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण भागात मुलींना ओझे आणि जबाबदारी समजले जाणे वेदनादायी आहे. या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी कठोर कारवाई करायला हवी. - रूपाताई कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/to5PpFu
राज्यात केवळ 10% बालविवाह रोखण्यात राज्य सरकारला आले यश:2019 ते जानेवारी 2025 दरम्यान 342 प्रकरणांमध्ये गुन्हा
April 29, 2025
0