Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणासाठी मुंबईत 29 ऑगस्टला आंदोलन:जरांगे म्हणाले - दीड वर्षात सरकारने काहीच केले नाही, आता आरपार लढाई

पुणे ,प्रतिनिधी _ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असून, पुन्हा आरपारची लढाई लढण्याचा निर्धार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सोबत ‘विजयरथ' असेल की ‘अंत्ययात्रारथ', हे सरकारनेच ठरवावे, असा थेट इशाराही त्यांनी या वेळी दिला. पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. जरांगे म्हणाले, की मराठा समाजाने दीड वर्षांचा वेळ देऊनही कोणतीही अंमलबजावणी झाली. मराठी आरक्षणासाठी आम्ही त्यांना संस्कारानुसार वेळ दिला, पण त्यांनी तो पाळला नाही. सरकारमधील कुठल्या मंत्र्यानेही अजून या प्रश्नी भेट दिली नाही. त्यामुळे आता मुंबईतून आम्हाला माघारी जा म्हणायला कुणाकडे जागा नाही. कितीही मोठे आंदोलन करावे लागले, तरी चालेल, पण आता लढाई आर किंवा पार आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी गिरीश महाजन समितीने दिलेला 58 लाख नोंदीचा अहवाल पुरेसा आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढण्याकरिता सरकारला आता ‘नाही' म्हणता येणार नाही, यास हैदराबाद, सातारा संस्थाने आणि बॉम्बे गव्हर्नमेंटची गॅझेट्स आधारभूत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील या आंदोलनाचा मुख्य उद्देश गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हा आहे. माझ्या गोरगरीब मराठा समाजातील माणसांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये तहसीलदार, कलेक्टर बनले पाहिजेत. पण, मराठा समाजाचे उपमुख्यमंत्री तसेच विविध खात्याचे मंत्री असूनही मराठय़ांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी या वेळी जोरदार टीका केली. जातीवाद करणाऱया लोकांना मंत्रिपद देऊन फडणवीस जातीय दंगली घडवत आहेत. ओबीसी समाजातील एका नेत्याला तर मराठा समाजाला उत्तर देण्यासाठी मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामागे कोण आहे, हे लपून राहिलेले नाही. सरकारची ‘लाडकी बहीण' योजना ‘खोटी आणि बनावट' आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी फडणवीसांवर टीका मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरूनही जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी ‘विल्हेवाट लावली' असून, ‘पूर्ण कार्यक्रम केला' आहे, असा आरोप त्यांनी केला. आरोपींना 'मोका' कायद्यातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला सरकारी वकिलांनी हरकत घेतली नाही, यावर त्यांनी आक्षेप घेतला. हे प्रकरण पूर्णपणे दाबले गेले आहे, असे जरांगेंनी सांगितले. देशमुख कुटुंबाने सांगितले, तरच या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7MoJxyp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.