Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 'हेराफेरी':न्यायालयात पुरावे देणार - पृथ्वीराज चव्हाण; बावनकुळेंवरही साधला निशाणा

विधानसभा निवडणूक निकालात हेराफेरी झाली आहे. त्या संदर्भातील पुरावे उच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीवेळी सादर करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून उमेदवार होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवाची कारणमीमांसा करताना निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांनी निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकालानंतर तातडीने मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (जिल्हाधिकारी) माहिती मागवली होती. त्यांनी दिली नाही. या सर्व बाबी आम्ही सुनावणीवेळी न्यायालयात मांडू. तसंच हेराफेरीचे पुरावेही सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारत होणार आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेमुळं येत्या दहा-पंधरा वर्षात विरोधकांना देशात संधी दिसत नाही. त्यामुळेच राहुल गांधींनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विकसित भारत होणार आहे का? विकसित भारताचं दिवास्वप्न दाखवून तुम्ही लोकांची फसवणूक का करताय? भारत कसा विकसित होईल याची आधी चर्चा करा. तिबार मतदान केल्याचा आरोप राज्याच्या काही भागात मतांचा टक्का वाढल्याचं सांगत निकालाचे समर्थन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना 'चार महिन्यात इतकी मतं कशी वाढली'? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दुबार, तिबार मतं तुम्हीच नोंदवू दिली आणि शाई पुसून त्यांनी दुबार, तिबार मतदान केल्याचा थेट आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निवडणुकीतील हेराफेरी मॅच फिक्सिंगसारखीच नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेली हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखीच आहे. फिक्सिंग करणारा संघ सामना जिंकू शकतो. भाजपचा विजय तसाच आहे. मॅच फिक्सिंगने होणाऱ्या निवडणुका लोकशाहीसाठी घातक असतात. तसेच निवडणूक प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन कधीही भरून न येणारे नुकसान होते, असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांच्या लेखात म्हटलंय. त्यांच्या लेखामुळे देशातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. त्यासंदर्भातच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. हे ही वाचा... जनतेचा विश्वास मिळवा, खोटे आरोप थांबवा:राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पलटवार; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 'चोरी' केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/fJd8czN

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.