Type Here to Get Search Results !

कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला:खुर्ची बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघाती प्रहार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर तसेच फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला, शिवसेना ही एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे. त्या उपऱ्याला कळालेले नाही. भाजपला कोणीही अध्यक्ष चालतो हे तो उपरा विसरला. खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, असा घणाघात ठाकरे यांनी शहा यांच्यावर केला आहे. तसेच नुसता खुंटा लावला आहे, खालीवर काही नाही, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटले. खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? उद्धव ठाकरे म्हणाले, मिंद्यांना विचारतो की तुमची दाढी वाढते का दाढी देखील भाड्याने घेतली आहे. जागा नसती मिळाली तर झाला असता का खासदार? खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? भाव नसता मिळाला. खायला सुद्धा भाव असायला लागतो. मिंधेला मंत्री आणि आमदार कोणी केले? भाजपने पाठीत वार केला. ही जागा भाजप पुढील निवडणुकीत सोडणार आहे का? जर सोडणार असतील तर त्यांनी आत्ताच जाहीर करावे हा मतदारसंघ आम्ही एकनाथ शिंदे यांना देतो. भाड्याने दाढी, गाडी खुर्ची मिळेल, पण जीवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत. ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंनी मतदारांची मागितली माफी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, इथून जर पाहिले तर शिवसैनिक नाही तर पेटलेल्या मशाली दिसत आहे. गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या. वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे आणि त्यांची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे. शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिले. उमेदवार म्हणून निवडले होते आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली तोडली. भाजपला गल्लीतले कुत्र विचारत नव्हते तसेच ज्या भाजपला गल्लीतले कुत्र विचारत नव्हते तेव्हा त्याचे बोट धरून मोठे केले. नाही, तर कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. स्वतःचे काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे. काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केले नाही तो भाजपने केला. ज्यांना लढायचे त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PE2p19d

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.