मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने वाद उफळून आला आहे. याप्रकरणी प्राजक्ता माळी हिने आज पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. या दोघांच्या वादावर अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. धस यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते. त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले. प्राजक्ता माळी हिने देखील पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध नोंदवला. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अशात अमोल कोल्हे यांनी उपरोक्त वक्तव्य करत सुरेश धस यांची बाजू घेतली आहे. धसांकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही त्यांच्यासंदर्भात वाद होईल असे वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरे झाले असते, असे अमोल कोल्हे म्हणाले. सुरेश धस यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते. त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही. सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही. धस यांचे स्टेटमेंट हे क्लियर आहे, असेही अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. हे संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करावे, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली. यावेळी बीडच्या मोर्चावर बोलताना, सर्वसामान्य जनता जागी आहे, हे मोर्चातून दिसून आल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस लागतायत, याचा अर्थ कोणतरी पाठिशी आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. हे ही वाचा... प्राजक्ता माळीचा संताप, म्हणाली- सुरेश धसांनी माफी मागावी:धस यांनी मागणी फेटाळली, म्हणाले- हास्यजत्रा पाहणे सोडणार! भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यावरूनच राजकारणात कलाकारांना का खेचता? असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सुरेश धस यांना केला आहे. या प्रकरणावर शांत राहा, असे मला सर्वांनी सांगितले. या सर्व आवया येतात आणि निघून जातात. चिखलफेक होऊ नये, म्हणून मी इतके दिवस शांत बसले. परंतु, लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे गरजेचे आहे, असे प्राजक्ता माळी म्हणाली. सविस्तर वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/guS0ZKG
प्राजक्ता-सुरेश धस वादावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया:म्हणाले - त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही, त्यांचे स्टेटमेंट क्लियर
December 28, 2024
0