Type Here to Get Search Results !

प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना..:पंकजा मुंडे यांची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट, आमदार धसांना लगावला टोला

बीड येथील मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. इव्हेंट पॉलिटिक्स शिकायचे असेल तर बीडमधून शिका या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला त्यात प्राजक्ता माळीचा देखील होता. यावरून प्राजक्ता माळी यांनी जाहीर माफी मागण्याचे आव्हान धस यांना केले आहे. यावर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव न घेत साहित्यिक भाषेत ट्विट केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी, असे आवाहन करणारी पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आहे व प्राजक्ता माळी यांचे समर्थन केले आहे. याच सोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. चित्रा वाघ यात म्हणतात, स्त्रीचा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे. त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते, असे म्हणत चित्रा वाघ यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार म्हणाले, प्राजक्ता माळी बीड हत्याप्रकरणावर बोलणार नाही. फिल्म इंडस्ट्रीतील कोणी यावर बोलत नाही, असे म्हणत सिनेकलाकारांवरच विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे. प्राजक्ता माळी यांनीही या प्रकरणावर बोलले पाहिजे, सिनेकलाकार अशा घटनांवर बोलत नाही. कल्याणच्या घटनेवर, बदलापूरच्या घटनेवर कोणी बोलताना दिसले नाही, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सिनेकलाकारांना फैलावर घेतले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/udEYG6L

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.