संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मांजा वापर करणाऱ्या ११ अल्पवयीन मुलांच्या पालकांविराेधात सदाेष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. नायलाॅन मांजाविराेधात राज्यात झालेली अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. दरम्यान, रविवार आणि सोमवार दोन दिवसांत मांजा वापर करणाऱ्यांसह ७४ विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. घातक नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई न करता थेट तडीपारीची कारवाई करण्यात येत असल्याने काही प्रमाणात वापरावर निर्बंध आले होते. मात्र वडाळा नाका येथे मांजाने गळा चिरून युवकाला ७४ टाके पडले. सुदैवाने त्याचा जीव वाचला. याची गंभीर दखल घेत पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विक्री आणि वापरकर्त्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याची दखल घेत १३ पोलिस ठाण्यांची २६ पथके व गुन्हे शाखेच्या ५ पथकांनी शहरातील विविध परिसरात सापळा रचून छापेमारी करत एकाच दिवशी २४ गुन्हे दाखल केले. दोन दिवसांत ७४ विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ११ अल्पवयीन मुलांच्या पालकांचा समावेश आहे. संभाजीनगरला दीड महिन्यात ३५ जणांना दुखापत, १० अटकेत छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलाॅन मांजामुळे गेल्या दीड महिन्यात १० जणांना अटक करण्यात आली. या कालावधीत नायलाॅन मांजामुळे ३५ नागरिकांना गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी एकूण ५० गुन्हे दाखल झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३४ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर १३ ते १५ जानेवारीदरम्यान तडीपारीची कारवाई नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करीत ३४ जणांना १३ ते १५ जानेवारी या ३ दिवसांसाठी तडीपार केले. राज्य शासनाची बंदी असताना जिल्ह्यात छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री सुरू होती. साेमवारी अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी चंद्रपूर पोलिस ठाणे हद्दीतील १९,रामनगर, घुग्गुस २ , दुर्गापूर ४ , मूल १ मधील अशा एकूण ३४ नायलॉन मांजा विक्रेत्यांचा समावेश आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी नागपुरात नायलॉन मांजाविरोधी मोहीम राबवण्यात आली. यात जप्त करण्यात आलेल्या १८ लाख रुपयांच्या जीवघेण्या मांजा व चक्री जरीपटका भागात बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आल्या. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १४ उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सदाेष मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात दाेषाराेपपत्र दाखल केल्यानंतर वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. भारतीय न्याय संहितेच्या नव्या कलमांनुसार या प्रकरणात १० वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. - अॅड. रवींद्र निकम, सरकारी वकील, नाशिक
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TXhRJ7p
नायलॉन मांजाविरोधात राज्यातील पहिलीच कारवाई:11 मुलांचे पालक अटकेत; सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा
January 13, 2025
0