राजमाता जिजाऊ यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बालपणी केलेल्या सुसंस्कारामुळे ते हिंदवी स्वराज्य उभारू शकले व त्याचे रूपांतर सुराज्यात करू शकले. जिजामाता या रयतेचे दुःख नष्ट करणाऱ्या जनकल्याणकारी राजमाता होत्या, असे मत आ. किरण सरनाईक यांनी व्यक्त केले. जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मोर्शी येथे राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आ. किरण सरनाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘परिमल’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. परिसर स्वच्छता, वर्ग सजावट स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. राजमाता जिजाऊ जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष सुहास ठाकरे (अध्यक्ष, विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला) होते. प्रमुख वक्ते सुधाकर घोटे (से.नि. मुख्याध्यापक) तर प्रमुख पाहुणे विमल वि. ठाकरे, विकास ना. ठाकरे, प्राचार्य सुधीर कुमार सवाई, एस. एस. राऊत, एस. एन. येवले, पी. आर. पाटील, डॉ. पंकज केचे, शुभा सु. ठाकरे, विजय शिरभाते, दीपक भुयार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. माजी प्राचार्या माया मुळे, डॉ. ऋतुजा सागर श्रीराव, पी. एस. विरखरे व स्नेहलता अर्डक यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुहासराव ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्था सचिव विकास ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुधाकर धोटे यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन व कार्य या विषयावर विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य सुधीर कुमार सवाई यांनी केले. याप्रसंगी आयोजित वक्तृत्व स्पर्धेतून शिवरायांच्या सर्वधर्म समभावाची उपस्थितांना जाण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव या विषयावर प्राचार्य सवाई यांच्या अध्यक्षतेत वर्ग ५ ते १२ ची वक्तृत्व स्पर्धा ज्योती पद्मने यांच्या संयोजनात घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी शिवरायांबद्दल विचार मांडले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीचे उद्घाटन मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुहास ठाकरे, एस. एस. राऊत, उद्योजक शिरभाते, इंगळे उपस्थित होते. प्रभात फेरीतील जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच लेझीम पथक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने मोर्शी नगरी दुमदुमली होती. सोनाली गौरव ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. सूत्रसंचालन व्ही. ई. कानबाले यांनी केले, तर आभार जे. एस. सराटकर यांनी मानले. प्रभात फेरीने मोर्शी दुमदुमली, लेझीम पथक लक्षवेधी
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/St2WuJb
अभिवादन .:राजमाता जिजाऊ यांचे कार्य सर्व घटकांसाठी प्रेरणादायी- सरनाईक, जिजामाता शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्सव, स्नेहसंमेलन
January 14, 2025
0