Type Here to Get Search Results !

न.प.मध्ये अतिक्रमण नियमित करण्यासाठी धरणे आंदोलन:50 वर्षांपासूनचे रहिवासी घरकुल योजनेपासून राहिले वंचित

बाभूळगाव बाभूळगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मागील ५० वर्षांपासून शासकीय, निमशासकीय जागांवर अतिक्रमण करून राहत असलेल्या रहिवासींयाचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे, शासनाच्या . १७ नोव्हेंबर २०१८ च्या जीआरची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी येथील रहिवाशी दि. ३१ जानेवारीला नगर पंचायतसमोर धरणे आंदोलन करणार आहेत. रहिवासी पट्टे नसल्यामुळे येथील रहिवासी शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या संबंधिचे निवेदन येथील नागरिकांनी मंगळवार दि. २८ जानेवारीला जिल्हाधिकारी यांना तहसिलदार यांचेमार्फत पाठविले. बाभूळगाव नगर पंचायत हद्दीतील शासकीय व निमशासकीय जागेवरील अतिक्रमणधारक मागील ५० वर्षांपासून येथील जागेवर घरे बांधून राहात आहेत. अतिक्रमण धारकांचे पट्टे नियमानुकूल करण्याबाबत शासनाचा सन २०१८ चा शासन निर्णय असून तसा आदेशही झाला आहे. परंतु, वारंवार निवेदने देवूनही येथील नगर पंचायत प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे येथील रहिवासी असूनही घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ नागरिकांनी ३१ जानेवारीपासून सकाळी ११ ते ५ या वेळात नगर पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रशासनाने या विषयाची तत्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी धरमचंद छल्लाणी, शेख आरिफ छवारे, गजानन तिवसकर, रूपाली येवतीकर, प्रकाश उमरे, सुनिल पोलकडे, संगिता ठोंबरे, सिराज लियाकत अली, पार्वता साहू, सुभाष पिसे, सुरज श्रुंगारे, विश्वनाथ साहू, स्वाती रेड्डी, प्रभा जयसिंगपुरे, शेख मुस्ताक, जिजा कासार, सुनिता गुजर, लिला कुमरे, शशीकला जांभुळकर, प्रणिता कोचपटे, इश्वर बनकर, किशोर सहारे, शे. अकरम, शे. सलमान, , विश्वास आगरकर, शेख जुबेर, ज्ञानेष्वर मोहनकर, नासिरखाँ पठाण, अ. रशीद अ. सत्तार, शेख सलीम, जाकीर मुल्ला यांचेसह येथील रहिवासी उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन देताना नागरिक.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FQqzXbf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.