बदलापूर येथील २ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत मारला गेल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र हे एन्काउंटर बनावट असल्याचा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. स्वत:च्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद वाटतोे. त्यामुळे त्याच्या मृत्यूला ५ पोलिस जबाबदार आहेत, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. २३ सप्टेंबर २०२४ रोजी अक्षयचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी त्याची हत्या केली, असा आरोप करत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने न्यायदंडाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुरावे व न्यायसहायक प्रयोगशाळा अहवालाच्या आधारे अहवाल सादर झाला. बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत. त्यामुळे पालकांचे आरोप योग्य वाटतात. पोलिस मृत्यूला जबाबदार आहेत, असा निष्कर्ष अक्षयचे कुटुंब कर्जबाजारी, घरावर जप्तीची नोटीस अक्षय शिंदेच्या घरावर खासगी बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. वडील अण्णा शिंदे यांनी अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अत्याचार प्रकरणानंतर अक्षयच्या घराची तोडफोड झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय अज्ञात ठिकाणी गेले होते. पावसामुळे ठसे नाहीत : गृह राज्यमंत्री गृह राज्यमंत्री याेगेश कदम म्हणाले, ‘एन्काउंटर झाला, तेव्हा पाऊस होता. त्यामुळे बंदुकीवर अक्षयचे ठसे नाहीत. गन पावडरही दिसली नाही. फॉरेन्सिक अहवालात हे पुरावे नाहीत. पोलिसांनी संरक्षणासाठी एन्काउंटर केले.’ बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत : अहवाल बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. अक्षयच्या पायावर गोळी न झाडता, डोक्यात गोळी का? बचावासाठी अक्षयवर गोळी झाडल्याचा दावा संशयास्पद झटापटीत अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला हे म्हणणेही योग्य नाही. एन्काउंटर फेक आहे हा अक्षयच्या पालकांनी केलेला दावा खरा वाटत आहे. पाण्याच्या बाटलीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत. खोट्या चकमकप्रकरणी दोषी पोलिसांवर खटला चालवा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एन्काउंटर: राऊत खासदार संजय राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या केली का? तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हे झाले, अशी माहिती आहे. पोलिसांनी ज्यांच्या आदेशावरून एन्काउंटर केले त्यांच्यावर न्यायालयाने ठरवले तर ३०२ चा गुन्हा दाखल होईल. घटनाक्रम असा १३ ऑगस्ट : बदलापूरमधील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. १६ ऑगस्ट : पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. १९ ऑगस्ट : याप्रकरणी कंत्राटी कर्मचारी अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झाला. २० ऑगस्ट : बदलापूरच्या नागरिकांनी तीव्र अांदोलन केले. शाळेची तोडफोड केली. रेल्वेस्थानकात घुसून ९ तास रेल्वेमार्ग रोखून धरला होता. नंतर अक्षयला अटक. अक्षयच्या दुसऱ्या पत्नीनेही त्याच्याविरोधात तक्रार दिली होती, त्यामुळे त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. २३ सप्टेंबर : या गुन्ह्याच्या तपासासाठी तळोजा तुरुंगातून रिमांडसाठी नेत असताना अक्षय चकमकीत ठार झाला. सतीश खताळ एन्काउंटरचा पोलिसांचा दावा अक्षयला २३ सप्टेंबरला तळोजा कारागृहातून ठाणे येथे पोलिस व्हॅनमधून नेले जात होते. मुंब्रा बायपासवर त्याने एपीआय नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून ३ गोळ्या झाडल्या. एक गोळी माेरेंच्या पायाला लागली. त्या वेळी पीआय संजय शिंदे यांनी पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6g4NMx7
एन्काउंटर नव्हे, हत्या:पाच पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करा- हायकोर्ट, अक्षय शिंदेची चकमक बनावट, न्यायालयीन समितीचा ठपका
January 20, 2025
0