Type Here to Get Search Results !

सातकुंडला एकाचवेळी 5 अंत्ययात्रा‎:चिंचोली लिंबाजी येथून कन्नडला ऊस आणताना पिशोरजवळ ट्रक उलटला ‎

ऊसाने भरलेला ट्रक उलटल्याने कन्नड तालुक्यातील‎सातकुंड येथील पाच तर बेलखेडा तांडा येथील एक‎असे सहा मजूर ठार झाले, तर ११ जण जखमी झाले. या‎अपघातात मृत्युमुखी पावलेल्या सहापैकी पाच मजुरांवर‎भट्टीतांडा (सातकुंड) येथे एकाच वेळी दुपारी २ वाजता‎हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात‎आला. तर अन्य एका मृतावर बेलखेडा तांडा येथे‎अंत्यसंस्कार झाले. चिंचोली लिंबाजी येथून ऊस‎भरल्यानंतर ४० किमी अंतर पार करून ट्रक पिशोरच्या ‎‎खांडीत आल्यावर उलटला. तेथून मृतांचे सातकुंड हे‎गाव अवघ्या ५ किमीवर होते. तासभर मदत न‎मिळाल्याने ट्रकखाली सापडलेले सर्वजण मृत्यूमुखी‎पडले.‎ अपघातात किसन राठोड (३०), कृष्णा राठोड (३०), ‎‎मिथून चव्हाण (२६), मनोज चव्हाण (२३,सर्व रा.‎सातकुंड,ता. कन्नड) हे जागीच ठार झाले तर विनोद‎चव्हाण (२८) याचा छत्रपती संभाजीनगर येथील‎घाटी रुग्णालयात आणि ज्ञानेश्वर चव्हाण‎(२८,रा.बेलखेडा तांडा) याचा खासगी रुग्णालयात‎ आम्ही दिवसभर चिंचाेली लिंबाजी येथे‎ऊसताेडणी केली. त्यानंतर ट्रकमध्ये ऊस‎भरल्यावर रात्री ९.३० वाजता आम्ही जण‎कन्नडकडे निघालाे. कन्नडला रसवंतीला‎ऊस टाकून आम्ही कन्नडजवळच चार‎किमी अंतरावरील सातकुंड गावाला‎जाणार हाेताे. ट्रक चिंचाेलीहून‎काेळसवाडी खांडीत आल्यावर चालकाचे‎नियंत्रण सुटले. ट्रक हेलकावे खात‎खांडीच्या कपारीत उलटला. कन्नड ४‎किमीवर असताना हा अपघात झाला.‎अनेकांच्या अंगावर ऊसाचा ढिगारा पडला.‎तसेच कपारीत खडकावर आदळल्याने‎अनेकांच्या डाेक्याला, हाताला मार‎लागला. तासभर काहीही मदत मिळाली‎नाही, सर्वजण विव्हळत होते. मीदेखील‎जखमी असताना अनेकांना ऊसाच्या‎ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.‎नंतर माझीदेखील शुद्ध हरपली. मला‎डोक्याला, हाताला मुका मार लागला,‎दवाखान्यातच शुद्ध आली. केबिनमध्ये‎असल्याने बचावलो. त्यातच ट्रकखाली‎दबलेले काही सहकारी वेळेत मदत न मिळू‎शकल्याने गतप्राण झाले.‎ ४० किमी अंतर कापले, घरापासून ५ किमी अंतरावर असताना काळाची झडप‎ अपघातात मनोज चव्हाण आणि विनोद चव्हाण हे दोन्ही सख्खे भाऊ दगावले. मनोजच्या मुलाचे दोन दिवसांनी‎बारसे होते. तर विनोद चव्हाण याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. या अपघाताने चव्हाण कुटुंबियांनी दोघांचा‎कमावता आधार गमावला.मृत किसन राठोड यांच्या पश्चात चार लहान मुली आहेत. तर दुसरे मृत मिथून चव्हाण‎यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सर्वच मृत आपापल्या कुटुंबांचा कमावता आधार होते.‎ उपचार सुरु असताना मृत्यू झाला.‎तर सचिन राठोड (२२), राहुल‎चव्हाण (१९), रवींद्र राठोड (२५),‎सागर राठोड (२५ ), राणीबाई‎राठोड (३०, सर्व रा.सातकुंड),‎ट्रकचालक इस्माईल अब्दुल जेडा‎आणि क्लीनर उमर मुसा काकड‎(रा. गुजरात) हे जखमी झाले.‎त्यांच्यावर घाटीत उपचार करून‎त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे‎घाटीचे अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे‎यांनी सांगितले. तर अन्य दोन‎जखमी इंदलचंद चव्हाण (३१),‎लखन राठोड (२९) यांना‎चाळीसगावला हलवले आहे.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/lBRE1nM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.