आरोपी कृष्णा आंधळे फरार असताना वाल्मीक कराडला, विष्णू चाटेला कॉल झालेले आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. ते सराईत गुन्हेगार होण्यामागचे कारण म्हणजे पोलिस यंत्रणेतील काहीनी त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही. त्याला संबंधित पोलिसांचे अभय होते. आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत फरार आहे. तो कधी जेरबंद होणार? हा प्रश्न यंत्रणेलाच विचारायला हवा. आज कोर्टात युक्तिवाद झाला. ४२ मिनिटे अॅड. उज्जल निकम बोलले. त्यांचे बोलणे मुद्देसूद होते. पुढच्या १० तारखेपासून सुनावणीला सुरुवात होईल. आरोपींना कोणाचे पाठबळ होते. हे लवकरच स्पष्ट होईल. त्यांना नक्कीच शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला. मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे बुधवारी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी बार्शीला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माधव देशमुख, नितीन देशमुख, अॅड. गणेश हांडे, महेश देशमुख आदी उपस्थित होते.एकादशीचे औचित्य साधून धनंजय देशमुख यांनी आज भगवंताचे दर्शन घेतले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, भगवंताचे दर्शन माझा भाऊ माझे सर्वस्व होता. क्रूरकर्मी लोकांनी त्यांची हत्या करून माझे सर्वस्व हिरावले. आमच्या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली अन सारे उद््ध्वस्त झाले. आज पहिली वेळ असेल मी भगवंताला मन भरून, डोळे भरून बघितले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. घ्यायला मी नेहमीच येत होतो. आयुष्यात कधी संकट वाटले तर मी भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हायचो. सर्व कुटुंबाला सुखात ठेव अशी भगवंतचरणी प्रार्थना करायचो. परंतु, आज पहिली वेळ असेल की आज काही मागता आले नाही. स्व. संतोष यांची हत्या करणाऱ्या क्रूरकर्मी लोकांनी काहीच ठेवले नाही. आयुष्य जगण्याची प्रेरणा घेऊन जागतो आहे देशमुख म्हणाले, आमचे बालपण येथे गेले आहे. येथील गलांडे काकांनी दोनेक वर्ष आम्हाला मदत केली. पालनपोषण केले. नंतर खूपच हलाखीच्या परिस्थितीमुळे आम्ही मस्साजोगला गेलो. तेथील लोकांवर प्रेम केले. तिथे लोकांवर आम्ही प्रेम केले. तेथील लोक आम्हाला किती तळहातावर घेऊन जपतात हे तुम्ही पाहत आहात. माझ्यासाठी आजचा दिवशी मी पदरामध्ये काहीच घेऊन जाणार नाही. येथून मी विचार, आयुष्य जगण्याची प्रेरणा भगवंताकडून घेऊन जायचो. जुन्या आठवणींना उजाळा देऊन जायचो. आज मला शब्द फुटत नाहीत. आता सुरूवात कशी करायची. लहान लेकरं आहेत. आईवडील वृध्द झालेले आहेत. त्यांना कसे सांभाळायचे आणि हे आव्हान कसे पेलायचे ? सुखी आयुष्य आव्हानात्मक झाले
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/aGJz3vW
‘कृष्ण’कृत्य करणारा पोलिसांतल्या काही जणांच्या ‘आंधळे’पणामुळे अजूनही फरार:सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणावरून प्रश्न निर्माण झाला
March 26, 2025
0