Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय नागरी सेवा दिन विशेष:चारही बाजूंनी काेंडीमध्ये पकडण्याचे तंत्र वापरल्याने संपू लागलेत नक्षली, गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलतोय

प्रत्येकाची वेळ असते. एकेकाळी नक्षली भारी पडत होते. आता पोलिसांची वेळ होती आणि आहे. २००८ पासूनच पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात नक्षली मरत होते. पण, ते २ ते ८ या संख्येत होते. नक्षली पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होते. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात वा घातपातामध्ये फक्त पोलिस आणि सी-६० चे जवान शहीद होत होते. गडचिरोली जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक अभ्यास करून नक्षल्यांची चारही बाजूंनी कोंडी करणारी चक्रव्यूह पद्धत आणली. यात पळण्याच्या सर्व वाटा बंद करून चारही बाजूंनी घेराव घालण्यात येतो. परिणामी आज नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे, असे नक्षलवादविरोधी अभियायाचे महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. परिणामी नक्षली नेता अभय याने माघार घेत चर्चेची तयारी दाखवली. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “शरण या आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हा,’ असे खडसावले आहे. या आक्रमक धोरणामुळे चक्राकार पद्धतीमुळे नक्षल्यांना पहिल्यांदा हादरा बसला बोरिया कसनासूर येथे. २२ एप्रिल २०१८ रोजी सर्च आॅपरेशदरम्यान पोलिसांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात ३४ नक्षली ठार झाले. इथून नक्षल्यांचा पाया खचण्यास सुरुवात झाली. मधल्या काळात ५-६, ५-६ नक्षली मरणे सुरूच होते. २१ मे २०२१ रोजी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात १३ नक्षली, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी २७ नक्षली ठार झाले. १७ जुलै २०२४ रोजी १२ नक्षली ठार झाले. पहिले दर आठवड्याला चकमक होत असे, पण नक्षली पळून जात होते. म्हणावे तसे यश मिळत नव्हते. नक्षल्यांचे पळून जाण्याचे मार्ग बंद केले पाहिजेत हे लक्षात आल्याने चारही बाजूंनी कोंडी केली. त्याचे रिझल्ट आता दिसत आहे. नक्षली मरण्याची संख्या वाढली. ४ वर्षांत १२० नक्षली मारले गेले. हीच पद्धत पुढे इतर नक्षल प्रभावित राज्यांत केंद्राने सुरू केली. एकेकाळी संपूर्ण गडचिरोलीत फक्त आणि फक्त नक्षलवाद्यांची दहशत होती. आता ती संपुष्टात आलेली आहे. आतापर्यंत मन्नेराजाराम, पिपली बुर्गी, वांगेतुरी, गर्देवाडा, पेनगुंडा व नेलगुंडा येथे मॅकवेल पद्धतीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नक्षलवादविरोधी अभियान व गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे नक्षल दलम संपत आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीत ४ दलम आहे, तर ११ दलम पूर्णपणे संपलेले आहे. केंद्रीय समिती सदस्य ते कमांडरपर्यंत ४१ नक्षली मारले गेले आहेत. आज गडचिरोलीत गुंतवणूक येत आहे. स्थानिकांना रोजगार मिळत आहे. गडचिरोलीत टप्प्याटप्प्याने २५,००० कोटींची गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. लाॅयड स्टीलचे एम. डी. बालकृष्णन प्रभाकरन यांच्याकडून तब्बल १००० कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. काम करणारे कर्मचारी कंपनीचे मालक झाले आहेत. यात कंपनीत काम करीत असलेल्या ४७ आत्मसमर्पित नक्षल्यांचाही समावेश आहे. गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू उद्योग समूहाने ३ लाख कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांत १० हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट लॉइड मेटल्सतर्फे गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांत १० हजार रोजगार निर्माण करण्यात येणार आहे. लाॅयडला गडचिरोलीत ३४० हेक्टर लोह खनिजाचा पट्टा ३० वर्षांच्या लीजवर मिळाला आहे. प्रारंभी ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. दोन वर्षांत ही गुंतवणूक २० हजार कोटींपर्यंत जाऊन २० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोलीतील लोह खनिजाचा ग्रेड ६४ टक्के असल्याने पोलादाचे उत्पादन वाढणार आहे. तणावमुक्त राहण्यासाठी हे करतात 1 नियमित योग आणि ध्यानधारणा करतो. त्याने व्यक्तिमत्त्वात बदल होतो. 2 शारीरिक आरोग्य राखण्यासाठी : सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम करतो. 3 कुटुंबासाठी : रोज सायंकाळी १ तास देतो. आणीबाणीचा प्रसंग नसेल तर रविवार कुटुंबासोबत घालवतो. 4 सुटीचा सदुपयोग : “छावा’ सारखा हिट सिनेमा कुटुंबासोबत पाहतो. कुटुंबात पत्नी, सरस्वती पूजेच्या दिवशी जन्म झालेली मुलगी ज्ञानमुद्रा आहे. 5 दिनचर्येतील विशेष : शिस्त पाळतो. निर्व्यसनी आणि निरोगी आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1lYeNHn

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.