Type Here to Get Search Results !

ढेकळांचे पंचनामे करायचे का?:सिन्नरमधील व्हायरल व्हिडिओने कृषिमंत्री कोकाटे पुन्हा वादात

सिन्नरमध्ये नुकसान पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकऱ्यांसोबतचा संवाद शुक्रवारी चर्चेत आला. ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल कृषिमंत्रीच शेतकऱ्यांना विचारत असल्याची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. सिन्नरमध्ये नुकसानीच्या पाहणीवेळी शेतकऱ्यांनी त्यांना अधिकारी केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करायचे असल्याचे सांगत असल्याकडे लक्ष वेधले. या वेळी हार्वेस्टिंग केलेल्या पिकांचे पंचनामे कसे करायचे, शेतामध्ये पिकेच नसतील तर ढेकळांचे पंचनामे करायचे काय, असा सवाल कोकाटे यांनी विचारला. हार्वेस्टिंग करून घरात अथवा सुरक्षित जागेत साठवलेल्या शेतीमालाचे पंचनामे नियमात बसत नाही. मात्र शेतात पडून असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे कोकाटे यांनी सांगितले. यापूर्वी पवारांनी टोचले होते कान आपल्या स्पष्टवक्ते स्वभावामुळे कोकाटे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून अनेक वाद अंगावर ओढवून घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः कोकाटे यांचे कान टोचल्याची चर्चा मागच्या काळात रंगली होती. माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ : कोकाटे छत्रपती संभाजीनगर| ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्र्यांनी यूटर्न घेतला. माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. जिथे फळपिके नाहीत तिथे पंचनामा काय करणार, असे मला म्हणायचे हो. शुक्रवारी प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादासाठी ॲड. माणिकराव कोकाटे छत्रपती संभाजीनगरात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिक-सिन्नर येथे केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर सुधारणा करत असे जिथे फळपिके, मसाला पिकांचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eO4n0Fu

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.