Type Here to Get Search Results !

महावितरण कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन:एका महिन्यात समस्या सोडवण्याचे आश्वासन; नागरिकांचा इशारा - आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन

चांदूर रेल्वे येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी स्थानिक नागरिकांनी माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीन तास ठिय्या आंदोलन केले. वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या कार्यपद्धतीविरुद्ध नागरिकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. वारंवार वीज खंडित होणे, जुनाट ट्रान्सफॉर्मर न बदलणे, लूज वायरचा वापर आणि स्मार्ट मीटरची सक्ती या प्रमुख तक्रारी आहेत. तक्रार निवारण केंद्रातील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि हेल्पलाइन बंद असण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचे जुनाट ट्रान्सफॉर्मरमुळे नुकसान होत आहे. नागरिकांनी स्मार्ट/प्रीपेड मीटरची सक्ती थांबवण्याची मागणी केली. लूज वायरमुळे होणाऱ्या अपघातांमुळे घरगुती उपकरणांची मोफत दुरुस्तीची मागणीही करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी ठेकेदार-कर्मचारी संगनमतावर कारवाईची मागणी केली. हेल्पलाइन कार्यरत ठेवणे आणि गैरहजर कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा लागू करण्याची मागणी करण्यात आली. शेतीपूरक वीजपुरवठा नियमित करण्यासह सौर कृषीपंप व अनुदान योजनांना गती देण्याची मागणीही करण्यात आली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका महिन्यात सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sTvFzC4

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.