भारताच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण शिवाजी महाराजांचा शिवाजी ते छत्रपती शिवाजी असा प्रवास सोपा नव्हता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असली, तरी त्यांना राजा म्हणून मान्यता मिळण्यासाठी किंवा छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करणे आवश्यक होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राज्याभिषेकाविषयी थोडक्यात जाणून घेऊ या... छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्याकाळी देशात तसेच महाराष्ट्रमध्ये मुघल, अदिलशाही यांची हुकूमत होती. शिवरायांच्या आई जिजाई यांनी त्यांच्या बालपणापासून स्वराज्य स्थापनेचा विचार त्यांच्या मनी रुजवला. वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकत स्वराज्याचे तोरण बांधले. तसेच मावळ प्रदेशातील त्यांच्या निष्ठावंत सैनिकांच्या मदतीने विजापूर सल्तनतच्या राजवटीखालील पुण्याच्या आसपासचे अनेक प्रदेश जिंकले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि ते शिवाजीपासून रयतेचे छत्रपती झाले. पुणे आणि कोकण प्रदेशांवर नियंत्रण मिळवल्यानंतर, त्यांनी राजाची पदवी धारण करून हिंदू सार्वभौमत्व स्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच ६ जून १६७४ रोजी त्यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. या समारंभासाठी निवडलेली जागा रायगडमधील मेघडंबरी नावाच्या एका छोट्या गावात एक मोकळी जागा होती. असा अंदाज आहे की या समारंभात ५० हजार सामान्य लोक आणि २० हजार ब्राह्मण उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवरचे घटनाक्रम महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र ढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत बनवली. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला होता. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. मात्र, आपल्या राज्याची वैधता प्राप्त करण्यासाठी शिवाजी महाराजांना एक चांगला आणि प्रभावी राज्याभिषेक सोहळा आवश्यक होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध राज्ये संघटित करण्यासाठी आणि सामर्थ्यवान बनण्यासाठी त्यांना पूर्ण शासक व्हायचे आहे हे शिवरायांना कळले होते. परंतु, शिवरायांचा राज्याभिषेक सोपा नव्हता. सामाजिक-जातीय समस्यांमुळे, तसेच अनेक लोक त्यांना राज्यकर्ता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. तत्कालीन काळात राज्यकर्ते फक्त क्षत्रिय वंशाच्या लोकांना मानले जात होते. शिवराय क्षत्रिय नसल्याचे कारण देत त्यांना विरोध केला जात होता. शिवराज्याभिषेक सोहळा वर्णन शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकात सांगितल्यानुसार, काशीचे पंडीत गागा भट्ट यांनी हिंदू शास्त्रांनुसार शिवरायांचा राज्याभिषेक केला. त्यांनी गंगा, यमुना, गोदावरी, रवी, सिंधू, कृष्ण आणि कावेरी येथील पवित्र जल असलेले सोन्याचे पात्र शिवाजीच्या डोक्यावर धरले आणि पवित्र पात्रातील पाण्याचा शेवटचा थेंब पूर्णपणे रिकामा होईपर्यंत राज्याभिषेक मंत्रांचा जप केला. स्नान झाल्यावर, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आई जिजाबाईंच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुख्य पुजाऱ्याने मंत्र पठण करून शिवाजीच्या खांद्यावर जाण्व नावाचा पवित्र धागा घातला. विधी संपल्यानंतर, शिवाजी राजाचा पोशाख परिधान करून सिंहासनाकडे निघाले. ते जात असताना, सर्व ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केला. गर्दीने उत्साहाने 'जय जय' असा जयघोष केला आणि संगीतकारांनी संगीत वाजवले. समारंभाला शाही स्पर्श देण्यासाठी, तोफगोळे देखील सोडण्यात आले. त्यानंतर, पंडित भट्ट सोने आणि मोत्यांनी सजवलेली शाही छत्री घेऊन फेकण्याच्या दिशेने निघाले. ते शिवाजी महाराजांजवळ उभे राहिले, त्यांच्या डोक्यावर छत्री धरली आणि त्यांना छत्रपती (सर्वोच्च सार्वभौम), क्षत्रिय कुलवंत (क्षत्रियांचा प्रमुख), शककर्ता (एका युगाचा प्रमुख आणि संस्थापक), आणि हैंदवी धर्मोधरक (हिंदू धर्माचे पावित्र्य उंचावणारा) ही पदवी बहाल केली आणि त्यांना 'राजा' घोषित केले. हा राज्याभिषेक भारताने इतिहासात पाहिलेल्या सर्वोत्तम राज्याभिषेकांपैकी एक होता. त्यांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच, शिवरायांना हत्तीच्या पाठीवर बसवून राजधानीच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत त्यांचे मंत्री, सेनापती आणि सामान्य लोकही होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते आणि मुघलांकडून परवानगी न घेता त्यांनी राज्याभिषेकाचे धाडसी पाऊल उचलले म्हणून लोकांना त्यांचा अभिमान होता. परंतु १८ जून १६७४ रोजी त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन अशुभ मानले जात असल्याने, सर्व पुरोहितांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी पुन्हा राज्याभिषेक सोहळा करण्याचा निर्णय घेतला, जो निश्चल पुरी यांच्या बंगाली तंत्रशास्त्रानुसार पार पडला. राज्याभिषेकाचे महत्त्व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर पारतंत्र्याचे काळेकुट्ट ढग पसरलेले असताना स्वतंत्र राष्ट्राचे अस्तित्व प्रस्थापित करून सबंध देशाला स्वातंत्र्याची नवी उर्मी आणि चैतन्यशक्ती प्रदान करण्याचे काम निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे सबंध देशात 'मुद्रा भद्राय राजते' म्हणजे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले. विजयनगरच्या पतनानंतर संपूर्ण भारतात एकही स्वतंत्र राज्य नव्हते. परंतु, शिवराज्याभिषेकानंतर ही कमतरता भरून निघाली. भारतात बलाढ्य मोगली सत्ता असताना त्यांचा प्रतिकार करण्यासाठी एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर वैधानिकता मिळाली. सर्व भारतीय शासकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सार्वभौम असल्याचे मान्य केले. रायगड किल्ल्यावर झालेल्या या सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील रयतेमध्ये एक नवा उत्साह आणि उमंग निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा विस्तार झाला आणि त्यांच्या राज्याभिषेकामुळे एक प्रेरणा मिळाली जी आजतागायत संपूर्ण भारतीय इतिहासात महत्त्वाची मानली जाते. शिवराज्याभिषेकाविषयी अभ्यासकांची मते यदुनाथ सरकार 'शिवाजी अँड हिज टाईम्य' या ग्रंथामध्ये लिहितात, शिवाजी महाराजांनी एक प्रकारे कल्याणकारी राज्याची स्थापना केली होती. कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आणि आखलेल्या योजना इतक्या दूरदृष्टीच्या होत्या की, त्यातून त्यांच्यातील दूरदर्शीपणा आणि सामान्य जनतेविषयी असलेला आदरभाव दिसून येतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 'मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष' या ग्रंथामध्ये म्हणतात, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेला मराठी सत्तेचा उदय म्हणजे भारतीय राष्ट्रीय इतिहासातील राष्ट्रवादाच्या उदयाचा परिपाक होय. परकीय सत्ता आणि त्यांच्या आक्रमणामागील दुष्ट हेतूंचा विचार करून भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने एक नवा वर्गबिंदू सिद्ध केला. त्यामुळे भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा हा एक श्रेष्ठ क्षण म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज : धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, लोकाभिमुख राजे लोककल्याण, सुशासन, बालक व महिलांचा सन्मान, समताधिष्ठित आणि अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार चालवण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणातून मिळते. त्यांनी स्वत: कधीही जात अथवा धर्मभेद केला नाही. इतिहासात डोकावताना असे लक्षात येते की, त्यांनी विज्ञानवादाची साथ कधीही सोडली नाही. त्यासाठी अनेक दाखले देता येतील. महाराजांच्या दरबारात कधीही भेदाभेद केला गेल्याचा पुरावा आपल्याला आढळत नाही. धर्मस्थळ, धर्मग्रंथ, स्त्रिया, बालके आदी शत्रूंची जरी असली तरी त्यांचा योग्य दर्जा आणि सन्मान राखला गेला पाहिजे, असे स्पष्ट आदेश त्यांनी आपल्या प्रांताध्यक्षांना दिलेले होते. दुष्काळग्रस्तांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची कल्पना सर्वप्रथम त्यांनीच आपल्या राज्यात मांडली अन् ती काटेकोरपणे अमलातही आणली. महाराजांनी दिलेले लढे हे राजकीय स्वरूपाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही लढाईला धार्मिक अथवा जातीचे स्वरूप दिले नाही. मोगल, आदिलशहा, इंग्रज आणि पोर्तुगीजांसोबत त्यांनी अनेक संघर्ष केले. मात्र लढ्यांना धार्मिक रंग चढू दिला नाही. तलवारी चालवल्या त्या राजकीय हेतूने. धर्मवादाचा लवलेशही त्यांनी लढायांना येऊ दिला नाही. किंबहुना त्यांच्या कधी ध्यानीमनीही असे विचार आले नाहीत. सर्व भाषांवर प्रेम आताचे राजकारणी भाषा, जात आणि धर्माच्या नावाने आपले ‘ईप्सित’ साध्य करताना दिसतात. महाराजांनी मात्र कधीही भाषेविषयी भेद केला नाही. त्यांना स्वत:ला पाच भाषा येत होत्या. मराठी, संस्कृत, कन्नड, फारसी आणि हिंदी भाषा त्यांनी अवगत केल्या. महाराजांचाच आदर्श घेऊन राजकारणात आलेल्या नेत्यांनी हिंदीला विरोध करून इंग्रजीला परकीय भाषा म्हणून हिणवले. मात्र भाषेच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ इच्छिणाया तमाम तरुणांनी जास्तीत जास्त भाषांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे. जर्मन, इंग्रजी, जपानी आदी भाषा आल्याच पाहिजेत, त्यासाठी हवे ते प्रयत्न करावेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी त्वरित प्रांताध्यक्षांना पत्र लिहिले. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करा, दुष्काळग्रस्तांची बैलजोडी दगावली असेल तर त्यांना बैलजोडी द्या, खंडी-दोन खंडी धान्याची रसद द्या. राज्याच्या तिजोरीवर बोजा पडला तरीही काहीच हरकत नाही. पण गरजेनुसार सर्वांना मदतीचा हात देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी केल्या. त्याशिवाय वसुलीचा तगादाही लावू नका, असेही निक्षून सांगितले होते. महिला शत्रूंच्या शौर्याचाही सन्मान कर्नाटक राज्यातील बेलवाडी किल्ल्यावर महाराजांच्या सैन्याने स्वारी केली होती. बेलवाडी किल्ला अजिंक्य राहण्यासाठी सावित्रीबाई नावाच्या एका शूर महिलेने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र युद्धानंतर झालेल्या तहामध्ये महाराजांनी सावित्रीबाईच्या शौर्याची ‘तारीफ’ करत तिला तिचा किल्ला परत केला होता. स्त्रियांच्या पराक्रमाला - मग ती शत्रूच्या ‘खेम्या’तील असेल तरीही - महाराजांनी तिला योग्य मानसन्मान दिला. महाराजांचे औदार्य आजच्या पिढीने अंगीकारले पाहिजे. आपण किमान घरातील महिलांचा तरी मान राखला अन् स्त्रीजन्माचा आदर केला तरीही पुरेसे होईल असे वाटते. छत्रपती शिवरायांचा एक तरी गुण अंगीकारावा शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली, पण निष्पापांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक जसे होते, तसेच पोर्तुगीजांना किल्लेबांधणीचे अन् इंग्रजांना बंदुका अन् तोफा चालवण्याचे तंत्र विचारणारे व्यवहारी अन् आधुनिकही होते. प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल!
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7T4kMhE
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा:स्वराज्यासाठी राज्याभिषेक गरजेचा का होता? काय होता या मागचा हेतू?
February 18, 2025
0